भारताची राजधानी दिल्लीचे पूर्वीचे नाव इंद्रप्रस्थ आहे. हे नगर पांडवांनी वसवले होते. दिल्लीला हे नाव क्षत्रिय राजा दिलीप सिंह ढिल्लो याच्याकडून मिळाले होते. त्यापूर्वी शहराचे नाव खांडवप्रस्थ होते जे एक निर्जन आणि उजाड क्षेत्र होते. पांडवांनी जेव्हा कौरवांशी असलेला वाद सोडवण्यासाठी नवीन राजधानीसाठी भूमी मागितली होती तेव्हा त्यांना हे निर्जन क्षेत्र मिळाले होते, परंतु पांडवांनी त्याला सृष्टीतील सर्वांत भव्य नगर बनवले होते ज्याच्या भव्यतेचे वर्णन महाभारतात आहे. दिल्लीतील प्राचीन किल्ला पांडवांच्या काळातीलच आहे जो पांडवांनी निर्माण केलेला आहे. काही काळापूर्वी दिल्ली मेट्रो जमा मशिदीच्या जवळ उत्खननात एक भिंत मिळाली होती जी पांडवकालीन होती, तिला आसपासच्या लोकांनी दुसऱ्या धार्मिक स्थळात बदलले होते. आजही प्रगती मैदानाच्या आसपासच्या क्षेत्राला इंद्रप्रस्थ म्हटले जाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel