कृष्णाच्या उपदेशानंतर अर्जुन आणि भीष्म, द्रोणाचार्य आणि धृष्टद्युम्न यांच्यात युद्ध झाले. सात्यकीने भीष्मांच्या सारथ्याला जखमी केले. द्रोणाचार्यांनी धृष्टद्युम्नला अनेक वेळा हरवले अन त्याचे अनेक धनुष्य तोडले. भीष्मांनी अर्जुन आणि श्रीकृष्णाला अनेक वेळा जखमी केले. या दिवशी भीमाचे कलिंग आणि निषाद यांच्याशी युद्ध झाले आणि भीमाने हजारो कलिंग आणि निषाद मारून टाकले. अर्जुनाने देखील भीष्मांना भीषण संहार करण्यापासून रोखून धरले होते. कौरवांच्या बाजूने लढणारे कलिंगराज भानुमान, केतुमान, अन्य कलिंग वीर योद्धे मारले गेले.
कोण मजबूत राहिले : दुसऱ्या दिवशी कौरवांना जास्त नुकसान झाले आणि पांडव पक्ष मजबूत राहिला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel