सातव्या दिवशी कौरवांनी मंडलाकार व्यूहरचना केली आणि पांडवांनी वज्र व्यूहाच्या आकृतीत सेना उतरवली. मंडलाकार व्युहात एका हत्तीच्या जवळ सात रथ, एका रथाच्या रक्षणासाठी ७ अश्वरोहक, एका अश्वरोहीच्या रक्षणासाठी ७ धनुर्धर आणि एका धनुर्धाराच्या रक्षणासाठी १० सैनिक लावण्यात आले होते. सेनेच्या मध्यभागी दुर्योधन होता. वज्राकारात दाही मोर्चांवर घमासान युद्ध झाले.
या दिवशीने अर्जुनाने आपल्या युक्तीने कौरव सेनेत पळापळ माजवली. धृष्टद्युम्नने दुर्योधनाला युद्धात हरवले. अर्जुन पुत्र इरावान याने विंद आणि अनुविंद यांना हरवले, भगदत्तने घटोत्कचाला आणि नकुल सहदेवाने मिळून शल्यला युद्धक्षेत्रातून पळवून लावले. हे पाहून पुन्हा एकदा भीष्मांनी पांडव सेनेचा भीषण संहार केला.
विराट पुत्र शंख मारला गेल्याने या दिवशी कौरवांचे मोठे नुकसान झाले.
कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel