भीष्मांनी मोठ्या प्रमाणावर पांडव सेनेचा खात्मा केल्याने पांडवांच्या पक्षात भीतीचे वातावरण पसरले, तेव्हा कृष्णाच्या सांगण्यावरून पांडवानी भीष्मांसमोर हात जोडून त्यांना त्यांच्या मृत्यूचे रहस्य विचारले. काही वेळ विचार करून भीष्मांनी उपाय सांगितला.
यानंतर भीष्मांनी पांचाल आणि मत्स्य सेनेचा भयंकर संहार केला. तेव्हा पांडव पक्षाने भिश्मांसमोर शिखंडीला युद्धाला उतरवले. युद्धक्षेत्रात समोर शिखंडी उतरलेला पाहून भीष्मांनी शस्त्र खाली ठेवले. त्याच दरम्यान अतिशय कंटाळलेल्या अर्जुनाने आपल्या बाणांनी भीष्मांवर वार केले. भीष्म त्या बाणांच्या शरशय्येवर झोपले. भीष्मांनी सांगितले की ते सूर्याचे उत्तरायण झाल्यावरच देह सोडतील, कारण त्यांना आपले वडील शांतनू यांच्याकडून इच्छामृत्यूचे वरदान प्राप्त होते.
पांडव पक्षाचे नुकसान : शतानीक
कौरव पक्षाचे नुकसान : भीष्म
कोण मजबूत राहिले : पांडव
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel