कौरवांनी कासव व्यूह तर पांडवांनी तीन शिखरांचे व्यूह रचले. पांडव पुत्र भीमाने धृतराष्ट्राच्या ८ पुत्रांचा वध केला. अर्जुनाची दुसरी पत्नी उलूपी हिचा पुत्र इरावान याचा बकासुराचा पुत्र आष्ट्रयश्रंग (अम्बलुष) याने वध केला.
घटोत्कचाने दुर्योधनावर शक्तीचा प्रयोग केला परंतु बंगनरेशाने दुर्योधनाला बाजूला करून शक्तीचा प्रहर स्वतःवर झेलला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दुर्योधनाच्या मनात मायावी घटोत्कचाबद्दल भीती आणखी वाढली.
तेव्हा भीष्मांच्या आज्ञेने भगदत्तने भीम, युधिष्ठीर आणि अन्य पांडव सैनिकांना मागे हटवले. दिवसाच्या अंतापर्यंत भीमसेनाने धृतराष्ट्राच्या ९ पुत्रांचा वध केला.
पांडव पक्षाचे नुकसान : अर्जुनपुत्र इरावान मारला गेला.
कौरव पक्षाचे नुकसान : धृतराष्ट्राच्या १७ पुत्रांचा भीमाने वध केला.
कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला आणि दोन्ही पक्षांना नुकसान सोसावे लागले. परंतु कौरवांना जास्त नुकसान सोसावे लागले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel