अर्जुनाची अग्नी समाधीची प्रतिज्ञा ऐकून कौरव पक्षात आनंदी आनंद पसरला आणि त्यांनी योजना बनवली की आज युद्धात जयद्रथाला वाचवण्यासाठी सर्व कौरव योद्धे आपल्या प्राणांची बाजी लावतील. द्रोणांनी जयद्रथाला वाचवण्याचे पूर्ण आश्वासन दिले आणि त्याला सेनेच्या मागच्या भागात लपवले.
युद्ध सुरु झाले. भूरिश्रवा सात्यकीला मारणार होता तेव्हा अर्जुनाने भूरिश्रवाचे हात कापले, तो जमिनीवर पडला आणि सात्यकीने त्याचा शिरच्छेद केला. द्रोणांनी द्रुपद आणि विराट यांना मारले.
तेव्हा कृष्णाने आपल्या मायाशाक्तीने सूर्यास्त केला. सूर्यास्त झालेला पाहून अर्जुनाने अग्नी समाधीची तयारी सुरु केली. लपून बसलेला जयद्रथ जिज्ञासेला वश जाऊन अर्जुनाला समाधी घेताना पाहण्यासाठी बाहेर येऊन हसू लागला. त्याच वेळी कृष्णाच्या कृपेने सूर्य पुन्हा दिसू लागला आणि त्याच वेळी अर्जुनाने सगळ्यांना धुडकावून लावत कृष्णाकडून करण्यात आलेल्या कृत्रिम सूर्यास्ताने बाहेर आलेल्या जयद्रथाला मारून त्याचे मस्तक त्याच्या वडिलांच्या मांडीवर पाडले.
पांडव पक्षाचे नुकसान : द्रुपद, विराट
कौरव पक्षाचे नुकसान : जयद्रथ, भगदत्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel