पति प्रवासी सोडुन गेला ग बाई ॥ संसारीं सुख मज नाहीं ॥धृ०॥

आली भरनवती ही भरज्वानी । राव राजींद्र दावा नयनीं । टाहाव फोडिते मोरावाणी । धनद्रव्याच्या भरल्या खाणी । या नवतीची जळून झाली लाही । सांगा कानीं आवाई ॥१॥

या कर्माचा कैसा ठेवा । मी अपराधी काय तरि देवा । जोगिण होउन शोध करावा । तो सौदागर पलंगिं असावा । या विषयानें अगदिंच झाली लाही । सुचना मात्र करावी ॥२॥

धावा सख्यांनो, या शेजारीं । कधिं येतिल माझे अधिकारी ? । बसले मी रोखुन वाटा चारी । शांतपणें उरिं मारूं कटयारी । या वरुषाची घडि मज जाति ग बाई । कोणती गत करावी ? ॥३॥

या नशिबाचे कैसे ताले । राव राजींद्र महालीं आले । सुखसंतोषें सोहळे केले । भोग आतां तुझें भाग्य उदवलें । रामा छंद करुनि नित प्रसंगीं गाई । चौ मुलाखांत आवाई ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel